Pariksha Pe Charcha 2024: परीक्षेत येणारा ताण-तणाव दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदींचे सात सल्ले

Pariksha Pe Charcha 2024: 2017 पासून दरवर्षी नित्यनेमाने विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यासाठी घेतला जाणारा कार्यक्रम या वर्षी 29 जानेवारी 2024 रोजी पार पडला. देशभरातून ऑनलाइन लाखोंची गर्दी असणाऱ्या Pariksha Pe Charcha 2024 हा कार्यक्रम यंदा याठिकाणी घेण्यात आला. या कार्यक्रमात PM Narendra Modi यांनी पुढील सात सल्ले दिले. हे सल्ले विद्यार्थी शिक्षक आणि पालकांना महत्वाचे ठरणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Pariksha Pe Charcha
Pariksha Pe Charcha

 

Pariksha Pe Charcha 2024: परीक्षेत येणारा ताण-तणाव दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदींचे सात सल्ले

Pariksha Pe Charcha या कार्यक्रमामध्ये दिलेल्या सल्याचा हा पहिला भाग आहे. दोन भागामध्ये ही चर्चा एकत्रित करण्याचा पर्यान्त्न आहे. जे शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना उपयोगी पडणार आहे.

परीक्षा काळामध्ये अपेक्षांच्या ओझ्यांचा सामना करू शकत नाही या वेळीं कोणती भूमिका घ्यावी? Pariksha Pe Charcha

या कार्यक्रमात ओमान आणि दिल्ली येथून विद्यार्थ्यांनी विचारलेला प्रश्न- “परीक्षा काळामध्ये आईवडील, समाज, आजूबाजूच्या लोकांच्या अपेक्षांच्या ओझ्यांचा सामना करू शकत नाही या वेळीं कोणती भूमिका घ्यावी?”

PM Narendra Modi Advice On Pariksha Pe Charcha

परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात PM Modi म्हणतात, परीक्षा पे चर्चा या पर्वाचा हा सातवा भाग आहे. प्रत्येक वेळी हा प्रश्न आलेला आहे. प्रत्येक वेळी नव्याने वेगळ्या पद्धतीने समोर येत आहे. याचा अर्थ प्रत्येक आई वडिलांना पण या प्रश्नाचं अनुभव आला आहे. यासाठी मुलांना प्रत्येक प्रकारच्या ताण तणावाला समोर जाण्याचे किंवा अपेक्षांचे ओझे पेलण्यासाठी पालकांनी तयारी केली पाहिजे. ही तयारी मनापासून केली पाहिजे. कोणत्याही दबाव किंवा ताण तणावाला आपण आपल्या परीने जिंकू शकतो हा आत्मविश्वास बाळगला पाहिजे.

RTE Online Admission 2024-25

RTE प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे

RTE मोफत प्रवेश संपूर्ण माहिती

अनेकदा आपणच दबावाला ताण तणावाला बळी पडतो. हा ताण तणाव कमी करण्यासाठी शांत किंवा हातावर हात देऊन न राहता दबावातून बाहेर पडण्यासाठी हळूहळू कृती करणे आवश्यक आहे. Pariksha बाबतअनेकदा पालक, शिक्षक, आई वडिलांकडून दबाव आणला जातो. असाच दबाव अपेक्षा ह्या भावंडकडूनही आणला जातो. हा दबाव कमी करण्यासाठी शिक्षक, पालक, आणि विद्यार्थी यांनी मिळून कमी केला पाहिजे.

मित्रांसोबतच असलेली स्पर्धा यामुळे विद्यार्थ्यांना दबाव येतो अशावेळी काय करावे? Pariksha Pe Charcha

Pariksha Pe Charcha: अंदमान निकोबार आणि राजस्थान येथून पालक आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात पुढचा प्रश्न उपस्थित केला –  “Pariksha म्हणजे Peer Pressure आहे. मित्रांसोबतच असलेली स्पर्धा यामुळे विद्यार्थ्यांना दबाव येतो अशावेळी काय करावे?”

PM Narendra Modi Advice On Pariksha Pe Charcha

PM Modi म्हणतात, जीवनात स्पर्धाच नसेल तर जीवन प्रेरणाहीन बनेल. जीवनामध्ये स्पर्धा असणे आवश्यक आहे. ही स्पर्धा हेल्दी असणे आवश्यक आहे. अनेकदा पालकच घरात मुलांची तुलना इतरांशी करून अनहेल्दी स्पर्धेचे बीज पेरण्याचे काम करतात. हे मुळात पालकांनी करू नये.

Pariksha Pe Charcha
Pariksha Pe Charcha

 

एखादी स्पर्धा म्हटली की गुण सर्वाना समान असतात. एकादी स्पर्धा 100 गुणांची असेल तर सर्व परीक्षार्थी साठी 100-100 गुण असतात. एखाद्या विद्यार्थ्यांने 100 पैकी 90 गुण घेतले म्हणजे आपल्यासाठी फक्त 10 गुण राहिले असा अर्थ नाही तर आपल्या साठीही 100 गुण असतात. म्हणून आपली स्पर्धा इतरांसोबत नसून आपली स्पर्धा स्वतः सोबत आहे. हे आपल्या मनात खोलवर रुजले पाहिजे. त्यामुळे पालकांनी पालकानी आपल्या मुलांची तुलना इतर विद्यार्थी, शेजाऱ्यांशी किंवा समवयस्कांशी तुलना करू नये. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड तयार होऊन याचे विपरीत परिणाम दिसू लागतात. Pariksha Pe Charcha मधून ही गोष्ट दूर झाली पाहिजे

दुसरी गोष्ट म्हणजे जो विद्यार्थी ज्या विषयामध्ये पारंगत आहे त्याचा लाभ इतरांना करून द्यावा, एखादा विद्यार्थी मागे असेल तर इतर peer group मधील विद्यार्थ्यांची मदत घ्यावी.  अनेक असे मित्र पाहिलेत की माझा मित्र मागे राहिला म्हणून आपले यश साजरे न करता मागे राहिलेल्या विद्यार्थी मित्रांच्या पाठिशी उभे राहतात. त्यामुळे सामर्थ्यासाठी तुलने ऐवजी सहकार्याने पुढे जावे.

विद्यार्थ्यांना परीक्षा काळात तणावमुक्त कसे ठेवावे- Pariksha Pe Charcha

आंध्रप्रदेश आणि आसाम मधून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परीक्षा काळात तणावमुक्त कसे ठेवावे याविषयी प्रश्न विचारला.

PM Narendra Modi Pariksha Pe Charcha या कार्यक्रमात म्हणतात संगीतामध्ये मोठे सामर्थ्य आहे. विद्यार्थीच नाही तर जगाच्या पाठीवर प्रत्येक व्यक्तींचा तणाव दूर करण्याची क्षमता संगीतामध्ये आहे परंतु ते संगीताशी समरस झाला पाहिजे.
Pariksha काळातील ताण तणाव दूर ठेवण्यासाठी केवळ परीक्षा काळात मेहनत घेतली पाहिजे असे नाही तर शिक्षकांनी विद्यार्थी जेव्हा आपल्या वर्गामध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवतो तेव्हापासून ते परीक्षा काळापर्यंत त्या विद्यार्थ्यांसोबतच्या नात्यामध्ये दृढता वाढत गेली पाहिजे. शिक्षक विद्यार्थी हे केवळ विषयापुरता नाते नसावे. असे झाले तर विद्यार्थ्यांना ताण येणारच नाही. आणि हे नाते केवळ विषय शिकवण्या पुरते राहिले तर विद्यार्थ्यांना शिक्षकांना आणि पालकांना ताण येणारच आहे. ते स्वाभाविक आहे.

PM Narendra Modi Advice On Pariksha Pe Charcha

Pariksha Pe Charcha करताना PM Narendra Modi म्हणतात शिक्षकांनी मुलांच्या यशामध्ये पालक आणि परिवारपर्यंत जाऊन सहभागी झाले पाहिजे. ते साजरे केले पाहिजे. यामुळे शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि परिवार यामध्ये स्नेहाचे सहसंबंध वाढतील. यामुळे परीक्षेमध्ये ताण तणाव येणारच नाही. पुढे Modi म्हणतात एखाद्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी पारिवारिक कार्यक्रम जसे लग्न, लग्नाची पत्रिका दिली नाही तर शिक्षकांनी फक्त नोकरी केली त्याशिवाय काहीही साध्य झाले नाही असा अर्थ निघेल. कारण शिक्षकांचे काम हे केवळ शिकवणे नाही तर जीवन सुधारणे आहे.

9 thoughts on “Pariksha Pe Charcha 2024: परीक्षेत येणारा ताण-तणाव दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदींचे सात सल्ले”

  1. Majisa rache Dyaneshwar vidyalaya Latur aahe majhe Shara Sundar aahe maza shikshak Sangli shikva tat
    Malashi Kala layi avadta

    Reply
  2. Mazi shala Abhinav Vidya mandir English madhyam shar Bhayandar, Thane
    Shala mhanje maza v vayaktik srvangin vikasache Ghar ahe jithe shiksh kachi thap ani mitranchi hak srvakahi mazya shalechy ptangnat.

    Reply
  3. My school is my pride.Our Abhinav school is one of the best schools in the Mira Bhayandar. Our school has many facilities and a big ground. Moreover,our school have best teachers ,those who have best teaching skills .I love my abhinav school a lot.

    Reply

Leave a Comment

error: कॉपी करताय???